Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

जिल्ह्यात पावसामुळे 22 हजार हेक्टर पेक्षा अधिक कृषी क्षेत्र बाधित ; पाऊस सुरु असे पर्यंत पंचनामे सुरूच ठेवावेत: पालकमंत्री बाळासाहेब पाटील

 

जिल्ह्यात पावसामुळे 22 हजार हेक्टर पेक्षा अधिक कृषी क्षेत्र बाधित ; पाऊस सुरु असे पर्यंत पंचनामे सुरूच ठेवावेत: पालकमंत्री बाळासाहेब पाटील

प्रतिक मिसाळ- सातारा


जिल्ह्यात मागच्या काही दिवसात कमी दाबाच्या पट्यामुळे पडलेल्या पावसामुळे 22585.89 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरील पीक बाधित झाले आहे . तर ज्यांची क्षेत्र बाधित झालेली आहेत त्यांची संख्या 89041 एवढी आहे . तथापि अजून पाऊस थांबलेला नाही , त्यामुळे पाऊस सुरु असे पर्यंत पंचनामे सुरु ठेवा , असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले . विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते . यावेळी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई , खासदार श्रीनिवास पाटील आ मकरंद पाटील , आ . दिपक चव्हाण , आ महेश शिंदे , जिल्हाधिकारी शेखर सिंह , जि प कार्यकारी अधिकारी विनयकुमार गौडा संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थितीत होते . अतिवृष्टीने नुकसान झालेले क्षेत्र : सातारा तालुक्यातील एकूण 1109.72 हेक्टर क्षेत्र कोरेगाव तालुक्यातील एकूण 503.20 हेक्टर क्षेत्र , खटाव तालुक्यातील एकूण 2994.71 हेक्टर क्षेत्र , फलटण तालुक्यातील 3765.05 हेक्टर क्षेत्र माण तालुक्यातील 9298.26 हेक्टर क्षेत्र , वाई तालुक्यातील 567.57 हेक्टर क्षेत्र , जावली तालुक्यातील 435.60 हेक्टर क्षेत्र , खंडाळा तालुक्यातील 232.78 हेक्टर क्षेत्र महाबळेश्वर तालुक्यातील 564.02 हेक्टर क्षेत्र , कराड तालुक्यातील 1048.95 हेक्टर क्षेत्र , पाटण तालुक्यातील 2066.03 हेक्टर क्षेत्र असे एकूण 22585.89 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरील पीक बाधित झाली आहेत आहे .तसेच अतिवृष्टीमुळे मालमत्तांचे नुकसान झालेली असून यामध्ये रस्ते व मोऱ्या दुरुस्ती 470 कामे नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती 45 कामे , प्राथमिक आरोग्य केंद्र पुळकोटी वीज पडल्याने स्लॅबचे दुरुस्ती 1 काम , स्मशानभूमी कट्टा / निवारा दुरुस्ती 17 कामे , इमारतीस तडे गेल्याने दुरुस्ती , पत्रा व दरवाजे दुरुस्ती 17 कामे बंधारे दुरुस्ती 40 कामे , शाळा इमारतीस तडे गेल्याने दुरुस्तीची 3 कामे असे एकूण 590 नुकसान झालेल्या कामांची संख्या आहे . यांची दुरुस्ती करायची आहे . अतिवृष्टीमुळे एकूण 105 गावातील खंडीत झालेला विजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे . यामध्ये वडूज येथील 48 गावे व फलटण येथील 57 गावातील विजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे . 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झालेल्या बाधित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळते , पण अनेक ठिकाणी त्या पेक्षा कमी पाऊस होऊनही नुकसान झाले आहे , त्याबाबतीत शासनाला अवगत करावे अशी मागणी सर्व आमदारांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे यावेळी केली .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies