Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाच्या तपासात अक्षम्य दिरंगाई . अनिस शिराळाचे तहसीलदारांना निवेदन.

   डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाच्या तपासात अक्षम्य  दिरंगाई .
अनिस शिराळाचे तहसीलदारांना निवेदन
.

उमेश पाटील -सांगली  

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाच्या तपासात अक्षम्य  दिरंगाई  झाली आहे,या बाबत अंनिस शिराळा शाखेच्या वतीने तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की,विवेकवादी कार्यकर्ते , विचारवंत आणि महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ नरेद्र दाभोलकर यांचा  दि 20 ऑगस्ट 2013 रोजी  खून झाला . या दुःखद घटनेला येत्या २० ऑगस्टला आठवर्ष पूर्ण होताहेत . त्यानंतर कॉमेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूर येथे  गोळ्या झाडून हत्या केली.  डॉ नरेंद्र दाभोलकर आणि कॉमेड़ गोविंद पानसरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य फुले , शाहू , आबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या सारख्या विचारवंतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात खर्च करून महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराल भर घालली आहे . आपण एका बाजुला महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे असे म्हणता आणि दुस - या बाजूला महाराष्ट्रात पुरोगामी विचारवंतांचे खून पड़तात हे महाराष्ट्रासाठी नक्कीच भूषणावह नाही . डा एम एम कलबुर्गी हे महात्मा बहवेश्वर यांच्या विचारांचे अभ्यासक आणि संशोधक होते तसेच ते हम्पी विद्यापीठ , कर्नाटक चे कुलगुरू होते . साहित्य अकादमीचा 2006 साली त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता . लिंगायत विचारधारेतील ते एक पुरोगामी विचारवंत होते . तसेच त्यांनी अंधश्रद्धांना विरोध केला होता . त्यामुळेच त्यांची धारवाड येथे 30 ऑगस्ट 2015 रोजी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या केली . गौरी लंकेश या बेंगलोर , कर्नाटक मधील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता होत्या . गौरी लंकेश पत्रिका नावाचे साप्ताहिकाच्या - त्या संपादक होत्या . धार्मिक मुलतत्ववादी , अंधश्रद्धा आणि जातिय भेद यांच्या विरोधी त्या सातत्याने लिहीत होत्या . स्त्री चळवळीत सुध्दा त्यांचा सहभाग असे . या कामांसाठी त्यांना आण्णा पालीटकौवस्क पुरस्कार मिळाला होता . त्यांचा सुद्धा 5 सप्टेंबर 2017 रोजी त्यांचा त्यांच्या घराच्या बाहेर खून करण्यात आला . आमचा असा ठाम विश्वास आहे की , शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना योग्य वेळी अटक होऊन त्यांच्या खुनाचा तपास , सूत्रधारापर्यंत पोहचला असता तर त्यानंतर झालेले कॉमेड गोविंद पानसरे , डा.पा एम एम कलबुर्गी , पत्रकार गौरी लंकेश यांचे खुन झाले नसते . म्हणूनच आम्ही आजुनही तपासात होत असलेली दिरंगाई आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो .


या निवेदनावर प्रा. ज्ञानदेव मिरजकर, प्रा. विजय जोके , प्रा. रामचंद्र शिंदे , दस्तगीर   आत्तार यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies