प्रांताधिकाऱ्यांच्या सहकार्याने आदिवासी बांधवांना धान्यवाटप...
दिशा केंद्रामार्फत मदत वाटपाची केली होती मागणी
ज्ञानेश्वर बागडे-
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत
कोरोना आजाराच्या सावटात लावण्यात आलेल्या लाँकडाउनमुळे हातावर पोट असलेल्या कष्टकरी ,आदिवासीची होणारी ससेहोलपट थाबंवणे साठी सरकारी आणी गैरसरकारी संस्था संघटना पुढे आल्या होत्या या सर्वानी मदत दिल्याने अनेक आदिवासी ,कष्टकरी कुटुंबांना आधार मिळाला आहे .
सध्या कर्जत तालुक्यात शेतीची कामे संपली आणी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक आदिवासी कुटुंबे ही घरीच बसून असल्यामुळे धान्याची चणचण भासत आहे अशाच कातकरी कुटुबानी दिशा केन्द्र या सामाजिक संस्थेच्या माध्यामातून कर्जतच्या उपविभागीय महसूल आधिका-या कडे धान्याची मदत मागीतली होती या मागणीची दखल घेत गरज असलेल्या दिडशे आदिवासी कातकरी कुटुंबांना गव्हाचे पिठ पाचकिलो ,तांदूळ पाच किलो ,डाळ दोन किलो,तेल एक किलो ,एक किलो साखर ,साबण, मिठ आदि वस्तूचा समावेश असलेल्या किटचे वाटप करण्यात आले .
तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायत हद्दीतील तमनाथ कातकरवाडी येथे शंभर तर बीड ग्रामपंचायत मधील बीड कातकरवाडी ,खाणीचीवाडी येथील पन्नास आदिवासी कातकरी कुटुंबांना किट वाटप केले .
कर्जत खालापुरच्या उपविभागीय महसूल आधिकारी वैशाली परदेशी ,नायब तहसीलदार पुरूषोत्तम थोरात ,मंडळ आधिकारी मिलींद ति-हेकर ,कारकून आंधळे, दिशा केन्द्रचे कार्यकर्ते अशोक जंगले, वैश्नवी दभडे आदिच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले .
सरकारी रेशनवर फक्त तांदूळ आणी गहू मिळतो .डाळ तेल ,मसाला ,साखर याची आमच्या लोकांना गरज होती ते देण्याची मागणी आम्ही दिशा केंद्राकडे केली होती .त्या मागणी मुळेआम्हाला उपविभागीय अधिकारी यांच्याकडून ही मदत मिळाली .त्यांचे आम्ही आभार मानतो ..
सिताताई पवार (तमनाथ )
ख़डू वाघमारे (बीड कातकरवाई)
स्थानिक आदिवासी नागरीक