Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत जी जनतेला 'शॉक ' द्यायची तुम्हाला सवय आहे, मात्र जनता लवकरच तुम्हाला 'शॉक' देईल. जनता सर्वकाही बघतेय हे लक्षात ठेवा....



राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत जी जनतेला 'शॉक ' द्यायची तुम्हाला सवय आहे, मात्र जनता लवकरच तुम्हाला 'शॉक' देईल. जनता सर्वकाही बघतेय हे लक्षात ठेवा....


 भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटील यांचे  वक्तव्य


महाराष्ट्र मिरर टीम- मुंबई


एक बातमी वाचली की राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणत आहेत " वीज बिलं वाढलेली नाही , लोकांचा तसा समज झालाय." हे वाचून महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी अत्यंत वाईट वाटले. हे जोडून तोडून तयार झालेले तिघाडी सरकार संपूर्णपणे नागरिकांप्रती असलेली आपली जबाबदारी विसरली आहे. 


ऊर्जा मंत्री कदाचित परवा तुम्ही हे वाचलं नसेल की आपल्याच सरकारशी जोडलेले वसई विरार क्षेत्राचे आमदार आणि बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना जे 5.5 लाख रुपये विजेचे बिल आले आहे ते भरण्यास त्यांनी नकार दिला. आश्चर्याची बाब म्हणजे हे बिल त्यांना बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालयाचे आले आहे.तसेच वसई विरार मधील नागरिकांना हितेंद्र ठाकूर यांनी आवाहन केले आहे की कोणीही असे चुकीचे वीज बिल भरू नका. नागपूर मध्ये एका इसमाने 40 हजार रुपये विजेचे बिल भरण्यास असमर्थ असल्याने दुर्दैवाने आत्महत्या केली. ही संपूर्ण शासन आणि प्रशासनासाठी लज्जास्पद आणि खेदजनक घटना होती . त्यांच्या कुटुंबाने विजेचे बिल कमी करण्याची विनंती देखील केली होती परंतु काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले.


मंत्री मोहोदय, मी आपल्याला परत सांगू इच्छितो की ग्राहकांना 'शॉक' देणं बंद करा. जनतेने मोदी जी यांच्यावर विश्वास ठेऊन काँग्रेस आणि राहुल गांधींना जो शॉक दिला आहे तो विसरू नका. येत्या काळात तो तुम्हाला परत महाराष्ट्रात नक्कीच अनुभवायला मिळेल. जनता सर्वकाही बघतेय हे लक्षात ठेवा....

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies