Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सोयाबीन काढणीला झाली सुरुवात;आणि पावसाचा अवकाळी फटका .

 सोयाबीन काढणीला झाली सुरुवात;आणि पावसाचा अवकाळी फटका .

राम जळकोटे-तुळजापूर


  सध्या मराठवाड्यासह सर्वत्र सोयाबीन या पिकाच्या काढणीला सुरुवात झाली आहे.जो तो शेतकरी आपल्या पिकाला योग्य हमीभाव मिळेल या आशेने सुरुवात केली आहे. पण तुळजापूर तालुक्यातील काही भागात शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. एकीकडे पिकाची काढणी करण्याची घाई, अन दुसरीकडे दुर्दैवाने पावसाचा अवकाळी फटका याने शेतकरी राजा आता चांगलाच अडचणीत सापडला आहे.

.

इकडे आड अन तिकडे विहीर अशी परिस्थिती आता या बळीराजाची झाली आहे. एक तर महामारीच्या काळात जेवढ काही होत ते ही संपलं आणि आपल्याला संसाराचा गाडा चालवणं आता या बळीराजाना अवघड झालं आहे. 

तुळजापूर तालुक्यातील २०२०-२१ च्या कृषी अहवालानुसार शेतकरी राजाचे  सोयाबीन या पिकाचे ७५३१५.८४ हे क्षेत्र सोयाबीन  पेरणीचे आहे. 


https://youtu.be/kriQqKtIRBg


या अवकाळी पावसाने या सोयाबीनच्या शेतीत जणू पाण्याचे डबकेच निर्माण केले आहे. या पावसाने शेतकरी आता बेचैन झाला आहे. पेरणी करतेवेळी लागणारी बी-बियाणं ही उदारीच्या रुपात दुकानदारांकडून आणली होती, आणि आता या अवकाळी पावसाच्या तडाख्याने ते पैसे कसे परत करायचे हाच मोठा प्रश्न शेतकरी राजासमोर उभा आहे.? सरकारच्या वतीने महामारीच्या काळात शेतातील बंधावरती खत पोहोचवण्यात येईल अशी आश्वासन देण्यात आली होती मात्र त्याला अचानक कुठे ब्रेक लागला कुणास ठाऊक.? आता या अवकाळी पावसाच्या फटक्याने सोयाबीन पिकाची झालेली नुकसानी यावरती कृषी विभाग आणि सरकार काय विचार करेल याच प्रतीक्षेत शेतकरी राजा आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies