Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

वाहनचालकांच्या निष्काळजी पणाची दहशत अनाकलनीय अपघाताला कारणीभूत.

 मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 26/11 सदृश परिस्थिती. 

वाहनचालकांच्या निष्काळजी पणाची दहशत  अनाकलनीय अपघाताला कारणीभूत. 

शब्दांकन-गुरुनाथ रामचंद्र साटेलकर


26/11 हा दिवस सर्वांच्या मनात त्या दहशतवादी घटनेच्या निमित्ताने आजही ताजा आहे त्याच स्वरूपाचे तांडव एक्सप्रेस वे वर घडले. हा दहशतवादी हल्ला नव्हता तर वाहनचालकांच्या चुकीमुळे ही गंभीर घटना घडली. 26/11 रोजी साधारणपणे पहाटेच्या 2.00 वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेची एस टी बस साताऱ्यात कडून मुंबईकडे एक्सप्रेस वे वरून निघाली होती. किलोमीटर 9 च्या दरम्यान पनवेलकडे जाणाऱ्या बाह्य वळणाजवळ आली असताना अज्ञात वाहनाला ती घासली गेली. त्यामुळे अक्षरशः बसच्या एका बाजूच्या चिंधड्या उडाल्या. त्या बाजूला बसलेले आणि झोपेत असलेले जवळपास सर्वच प्रवासी त्यामुळे असे गंभीर जखमी झाले.


या धडकेचा आवाज एवढा प्रचंड होता की जवळच असलेल्या देवदूत यंत्रणेच्या तळावरून सगळे जवान त्या ठिकाणी धावले. हाकेच्या अंतरावर असलेल्या  महामार्ग पोलीसांच्या पळस्पे टॅपचे कर्मचारी देखील काही क्षणात मदतीला आले. आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स आणि लोकमान्य हॉस्पिटलची ऍम्ब्युलन्स सेवा त्वरित उपलब्ध झाली.  रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना रात्रीच्या अंधारात फक्त किंकाळ्या आणि विव्हळने ऐकू येत होत्या. सगळ्या यंत्रणांनी अत्यंत कसोशीचे प्रयत्न करून जखमींना लागलीच MGM हॉस्पिटल कामोठे येथे दाखल केले, त्यामुळे मोठी जीवित हानी आटोक्यात आली असली तरी, मृत्यूचे भय अजून घोंगावत आहे, आरोग्य यंत्रणा योग्य उपचार करत आहे. धडकेत एका प्रवाशाला मृत्यूने गाठले आहे आणि इतरांच्या जखमाही गंभीर स्वरूपाच्या आहेत.


26/11 आजचा हा दिवस त्या बसमधील प्रवाशांसाठी काळरात्र होती याची प्रचिती देऊन गेला.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies