Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

"बलिदानाचा संदेश" पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

 "बलिदानाचा संदेश" पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

नरेश कोळंबे-कर्जत



          कर्जत येथील महिला मंडळाच्या शाळेत आज दीं 10 रोजी सिध्दगडाच्या  स्वातंत्र्य संग्राम वर आधारित बलिदानाचा संदेश या पुस्तकाचे प्रकाशन लेखक वसंत कोळंबे तथा क्रांतिवीर यांचे वारसदार यांच्या हस्ते संपन्न झाला.

      कर्जत तालुकयातील स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांच्यावर सिद्धगड येथे झालेल्या  स्वातंत्र्य संग्रामावर आधारित पुस्तक " बलिदानाचा संदेश" या पुस्तकाचे प्रकाशन इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे तसेच उपस्थित क्रांतिवीर यांचे वारसदार यांच्या हस्ते झाले.

           2 जानेवारी 1943 रोजी सिद्धगड येथे क्रांतिवीर भाई कोतवाल, क्रांतिवीर हिराजी पाटील यांना गोळीबारात हौतात्म्य प्राप्त झाले. या कर्जत मधील हुतात्म्यांनी केलेल्या अनेक क्रांति कार्याचा व घडलेल्या घटनांचा उहापोह सदर पुस्तकात करण्यात आला आहे. भाई कोतवाल यांनी कर्जत येथे इंग्रज सत्तेविरुदध लढा देण्यासाठी आझाद दस्ता स्थापन केला व त्या द्वारे विविध क्रांतिकारी कार्य केले या सर्व गोष्टींचे माहिती या पुस्तकात दिली आहे. 

     


      

       या प्रकाशन सोहळ्यावेळी सुनील रसाळ यांनी सिद्ध गडचा स्वातंत्र्य संग्रामा ची माहिती देणारा पोवाडा गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.यावेळी माधव कोळंबे , महेश कोळंबे , संदीप देशपांडे यांनी तसेच अनेक मान्यवरांनी आपली मते मांडत पुढील कार्यासाठी इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे यांना शुभेच्छा दिल्या.  यावेळी क्रांतिवीर यांचे वारसदार म्हणून शोभाताई कुट्टी, विठ्ठल वालकु पाटील, शरद राघो भगत,मोहन नरहर ठोसर,चंदर रूपा कातकरी, महादेव बाळकृष्ण जुन्नर कर, नंदाताई डांगरे,एकनाथ जाधव ,  अनुसया जामघरे आदी लोक उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विजय कोंडिलकर यांनी केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies