Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

बामनकुंडी नदीनजीक रिक्षा पलटी होऊन अपघात:पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

 बामनकुंडी नदीनजीक रिक्षा पलटी होऊन अपघात:पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू 

            अमूलकुमार जैन-अलिबाग


 मुरूड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील भोईघर फाटा पासून काही अंतरावर असणाऱ्या बामणकोंंडी वळणावर रिक्षा पलटी होऊन अपघात घडला. या अपघातात रिक्षातील पती-पत्नी या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोंबिवली सोनारपाडा येथे राहणारे जगदीश मोतीराम वणे (वय 35) व ज्योत्स्ना जगदीश वणे (वय 28) हे दोघे मुरूड तालुक्यातील काजूवाडी येथे रिक्षाने आले होते.

ते दोघेही शुक्रवारी (दि.7) रात्री साडेआठचे सुमारास काजूवाडी ते भोईघर मार्गे बोर्लीकडे येत असताना रिक्षा बामणकोंडी वळणावर पलटी झाली. त्यांना लागलीच बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथील डॉक्टरांनी ते दोघेही मयत झाल्याचे सांगितले. सुदैवाने रिक्षा चालक अभिषेक चंद्रकांत राजापरकर हा या अपघातातून बचावला. या अपघाताचा अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार गणेश म्हात्रे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies