खेड शिवापूर महामार्गावर सध्या वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली असून सातारा,सांगली,कोल्हापूर हून मुंबई पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे.गणेशोत्सव काळात ही संख्या वाढल्याने वाहने टोल नाक्यावर मुंगीच्या पावलाने पुढे सरकत आहेत.पाच दिवसांचा गौरी गणपतीचे विसर्जन उरकून चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागल्याने ही वाहनांची संख्या वाढलीय.