Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या यंत्रणांचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

 ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या यंत्रणांचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

प्रतिक मिसाळ-सातारा



 सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत , सुरळीत व निर्भयपणे पार पाडाव्यात . यासाठी जिल्हा परिषद , राज्य उत्पादन शुल्क , नेमवलेल्या नोडल अधिकऱ्यांनी आपले कर्तव्य करावे . या कामात हलगर्जीपणा करू नये अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केल्या . जिल्हाधिकारी यांच्या दालनात ग्रामपंचायत निवडणुकीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते . या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे , निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे , उपजिल्हाधिकारी ( महसूल ) किर्ती नलवडे आदी उपस्थित होते . कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये , मतमोजणीच्या ठिकाणी तसेच आचार संहितेचे कोटेकोरपणे पालन होण्यासाठी पोलीस विभागाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा , अशा सूचना करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले , ज्या शाळांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान होणार आहे तेथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी . मतदानाच्या ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत रॅम्प , लाईट , पाणी तसेच फर्निचर तुटले असेल तर ते तात्काळ दुरुस्त करावे . तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडून निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मतदानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी . कुठेही अवैधपणे मद्याचे वाटप होणार नाही यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके कार्यान्वीत करावी . मतदानाच्या पेट्या मतमोजणीच्या ठिकाणी नेहण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून बसेस उपलब्ध करुन करण्याबाबतचे नियोजन करावे , अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies