Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी आता प्रशासनाबरोबर नागरिकांनीही पुढाकार घ्यावा . पालकमंत्री बाळासाहेब पाटील

 संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी आता प्रशासनाबरोबर नागरिकांनीही पुढाकार घ्यावा  . पालकमंत्री बाळासाहेब पाटील 

भारत फोर्ज कडून 24 गावांना कोविड रोखण्यासाठी लागणाऱ्या साधनांचे वाटप 

प्रतीक मिसाळ सातारा






सातारा दि .12  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाचे , राज्याचे व जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे . महसूल , पोलीस व आरोग्य विभाग पहिल्या कोरोनाच्या लाटेपासून काम करीत आहेत . आता कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे . या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांची मदत घेवून तिसऱ्या लाटेचा अधिकचा प्रभाव जाणावणार नाही यासाठी आत्तापासूनच प्रयत्न सुरु केले पाहिजे या कामात नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे , असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले . भारत फोर्ज लि . पुणे यांच्याकडून सी.एस.आर. निधीतून सातारा जिल्ह्यातील कोरेगाव , खटाव व माण तालुक्यातील एकूण 24 गावांना कोविड -19 साठी लागणाऱ्या भौतिक सुविधा व साधनांचे वितरण धामणेर ता . कोरेगाव येथे पालकमंत्री श्री . पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी ते बोलत होते . या वितरण प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा , प्रांताधिकारी ज्योती पाटील , तहसीलदार अमोल कदम , भारत फोर्जच्या लिना देशपांडे , सुनिल माने , शहाजी क्षीरसागर यांच्यासह विविध गावांचे सरपंच उपस्थित होते . भारत फोर्जचे कोरेगाव , खटाव व माण तालुक्यातील 24 गावांमध्ये विविध विकासात्मक कामे सुरु आहेत . भारत फोर्जचा उपक्रम अतिशय चांगला असून त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवून विविध गावांचा विकास केला पाहिजे . 24 गावांची गरज ओळखून कोरोनाच्या लढ्यासाठी लागणरी औषधे व इतर साहित्य आज पुरविले आहे . त्याबद्दल पालकमंत्री श्री . पाटील यांनी आभार मानले . यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले , आज गावोगावी विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहेत . त्यामुळे कोरोना रुग्णांना चांगला दिलासा मिळालेला आहे . ग्रामदक्षता समितीचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे . गावांना भेटी देण्यावर भर असून भेटी प्रसंगी ज्या अडचणी सांगण्यात येतात त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे . ग्रामसेवक व तलाठी यांनी आपल्या गावातच उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत . तसेच ग्रामदक्षता समितीने कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेवून त्यांची जास्तीत जास्त कोरोना चाचणी करावी . या कामासाठी शिक्षकांची मदत घ्यावी याबाबतचे आदेशही काढण्यात आले आहेत . लसीचा अधिकचा पुरवठा मिळण्याचे संकेत मिळत आहेत .



 लसीकरणबाबत योग्य नियोजन करावे , असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भारत फोर्जचा उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले . भारत फोर्ज गेली साडेतीन वर्ष विविध गावांमध्ये काम करीत आहे . सातारा जिल्ह्यातील 24 गावांमध्ये पाणी , आरोग्य , अंतर्गत रस्ते , गटारे , शिक्षण यासाठी काम करत आहे . हे काम करीत असताना नागरिकांचे सहकार्य मिळाले . ही 24 गावे आदर्श गाव म्हणून पुढे घेतील , असा विश्वास भारत फोर्जच्या लिना देशपांडे यांनी व्यक्त केला . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहाजी क्षिरसागर यांनी केले . या कार्यक्रमास धामणेर येथील ग्रामस्त , विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies